28 October 2016

॥ अमृतबोध ॥ २८ ऑक्टोबर २०१६

कोणत्याही रोगावरील औषध जर उत्तमरित्या व त्वरित लागू पडायला हवे असेल, तर त्याबरोबर त्याची पथ्ये पण पाळावीच लागतात. तसेच भवरोगावरील साधनारूपी औषध लागू पडायला हवे असेल, तर त्याचीही काही पथ्ये पाळायला नकोत का? त्यासंदर्भात प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज साधकांसाठी फार मार्मिक उपदेश करत आहेत.
साधकांनी दांभिक, व्यसनी व विषयी लोकांच्या; तसेच धर्म, धार्मिकता व सज्जन-संतांची निंदा करणा-यांपासून अगदी दूर राहावे. आपली साधना निर्विघ्नपणे व्हायला हवी असेल तर हे पथ्य पाळायलाच हवे !
या सर्व दुर्जनांचा संपर्कात आलेल्यांना तत्काळ आपल्यासारखेच करण्यात हातखंडा असतो. शिवाय त्यांच्याठायी असलेल्या कुमतीने असे लोक साधकांच्या मनातही त्याच कुबुद्धीची बीजे पेरतात, जी नंतर संशय रूपाने किंवा अश्रद्धेच्या रूपाने साधकांना खूप त्रास देतात. ढेकणाच्या संगतीने अतिशय कठीण हिरा देखील भंगतो म्हणतात, ते याच अर्थाने.
प. पू. श्री. मामा ज्या दुर्गुणांचा इथे उल्लेख करीत आहेत ती सर्व वाईट लक्षणे एकाचवेळी ज्याच्याजवळ पूर्ण फोफावलेली  असतात त्याला आजच्या भाषेत ' पुरोगामी विचारजंत ' म्हणतात. आपल्या देश, धर्म, संस्कृती व संतमहंतांबद्दल सतत गरळ ओकण्याचा एकमेव धंदा असलेल्या या दुर्जनांच्या संगतीत क्षणासाठीही राहू नये, त्यांचे वाङ्मय वाचू नये, त्यांचे बोलणे ऐकू नये किंवा त्यांच्या फालतू व बिनबुडाच्या मतांचा विचार चुकून देखील मनात आणू नये; हेच आपल्या शाश्वत हिताचे आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates