2 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६६ ॥*

सद्गुरु श्री माउली प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंतांच्या मुखाने महात्म्यांच्या संदर्भातले एक अद्भुत रहस्य सांगताना म्हणतात, "माझे एकवेळ नाम मुखात येण्यासाठी आधी हजारो जन्म तपश्चर्या करावी लागते, ते नाम सर्व काळ या महात्म्यांच्या वाणीवर नाचत असते ! म्हणूनच, एकवेळ मी वैकुंठात सापडत नाही, सूर्यबिंबात दिसत नाही, योग्यांनाही झुकांडी देऊन त्यांच्या ध्यानातून निसटून जातो, परंतु जे भक्त माझे निरंतर नाम गात असतात, त्यांच्यापाशी मी हटकून सापडतो !"
श्रीभगवंतांचे नाम एकवेळ मुखात येण्यासाठी देखील कैक जन्मांची पुण्याई गाठीशी असावी लागते. असे परमपवित्र व परमदुर्लभ भगवन्नाम महात्म्यांच्या वाणीवर मात्र सतत नाचत असते. आपण काय त्या महान संतांचा अधिकार वर्णन करू शकणार? श्रीभगवंत इतर कोठेही सापडले नाहीत तरी या प्रेमळ भक्तांच्या संगतीत ते निरंतर असतातच. म्हणूनच, अशा सद्गुरुरूप महात्म्यांची कृपा झाल्याशिवाय, त्यांच्याकडून ते दिव्यनाम मिळाल्याशिवाय श्रीभगवंत कोणालाही कधीही प्राप्त होत नाहीत !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates