25 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८८ ॥*

*प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज जयंती  !!*

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठातील नवव्या अभंगाची प्रस्तावना करताना म्हणतात, "सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील हा मोठा गोड अभंग आहे. तसे पाहिले तर, सर्वच अभंग एकापेक्षा एक असे वरचढ अाहेत. परंतु असे असले तरी, प्रत्येक अभंगाचे काही ना काही तरी वैशिष्ट्य आहेच. त्यांपैकी या अभंगाचे वैशिष्ट्य फार मोलाचे आहे. ते काय व कसे आहे? तेच आपण आता माउलींच्या कृपेने पाहणार आहोत.
या अभंगाच्या पहिल्या चरणात माउली म्हणतात, *"विष्णुवीण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाही ज्याचें ॥हरि.९.६॥"*
विष्णू शब्दाचा अर्थ प्रथम समजायला हवा. 'विष्णू' या शब्दाचा अर्थच 'व्यापून राहणारा, सर्वव्यापी' असा असल्यामुळे, तो सर्वांना व्यापून दशांगुळे उरला असे श्रुती सांगते.
आपल्याकडे जे पुराणांमधून वर्णिलेले दशावतार आहेत, ते विष्णूंनीच घेतलेले आहेत. यात एक लक्षात ठेवायला हवे की, इकडे अवतारकार्य चालू असताना, तिकडे क्षीरसागरात शेषशायी भगवान श्रीविष्णू नाहीत; असे कधी होत नसते."
पू.मामांचे हे सांगणे आपण उद्या एका अवताराचे उदाहरण घेऊन समजून घेऊया.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates