16 June 2017

॥ अमृतबोध ॥ १६ जून २०१७

॥ अमृतबोध ॥
१६ जून २०१७
॥ हरिपाठ मंजिरी - १८० ॥
हरिपाठाच्या आठव्या अभंगातील पाचव्या चरणात सद्गुरु श्री माउली पुराणातील महत्त्वाच्या कथेचा उल्लेख करताना म्हणतात, "सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला ।(हरि.८.५)"
याच्या स्पष्टीकरणासाठी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी पुराणातील एक कथा सांगत असत.
एकदा सनत्कुमार भगवान विष्णूंकडे जावयास निघाले. तेथे सातव्या कक्षेतील देवांच्या द्वारावर जय-विजय नावाचे द्वारपाल होते. त्यांनी सनत्कुमारांना न ओळखल्याने, दारावरच अडवले. त्यावर त्यांनी जय-विजयांना शाप दिला, "राक्षस होऊन मृत्युलोकी जाल !"
हे वृत्त श्रीभगवंतांना कळताच, ते तेथे आले व त्यांनी स्वत:च त्या शापास उ:शाप सांगितला. सनत्कुमारही दयावंतच होते. त्यांनी त्या द्वारपालांना सांगितले की, "तुझ्या पोटी भक्त जन्माला येईल व त्या भक्ताचा तू छळ करशील. त्यास वाचविण्यास देव येतील व त्या भक्ताचे रक्षण व तुझे मरण एकाचवेळी घडेल. देवांनी मारले म्हणून मग तुम्ही या जन्मातून मुक्त व्हाल !"
हेच जय-विजय हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू असे राक्षस होऊन पृथ्वीतलावर जन्माला आले. हिरण्यकश्यपूच्या कयाधु नावाच्या नावडत्या राणीच्या पोटी प्रल्हाद हा भक्तगर्भ राहिला. त्याच प्रल्हादांचा उल्लेख माउली याठिकाणी करतात. माउलींच्या त्या 'सत्वर उच्चार' शब्दाचा पू.मामांनी सांगितलेला गूढार्थ आपण उद्या पाहू
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates