29 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९२ ॥*

श्रीराम व श्रीकृष्ण हे भिन्न नाहीत. ते एकाच श्रीविष्णूंचे अवतार असून, कार्य पूर्ण झाले की पुन्हा त्या विष्णूंप्रतच जातात. हेच माउली अभंगाच्या दुस-या चरणात सांगतात की,
*"उपजोनि करंटा नेणें अद्वय वाटा ।*
*रामकृष्णीं पैठा कैैसेनि होय ॥हरि.९.२॥"*
याचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, प्राणिमात्र या जगात जन्मास येतो; म्हणजेच उपजतो. परंतु त्यास जर आल्याची वाट माहीत नसेल, तर अशा प्राण्याला माउली 'करंटा' म्हणतात.
व्यवहारात करंटा कोणास म्हणतात? तर ज्याला द्रव्य मिळवण्याची अक्कल नाही व जर चुकून बापाची इस्टेट हाती आली, तर ती व्यसनांपायी उधळपट्टी करून ज्यास दारिद्र्य येते, त्याला 'करंटा' असे म्हणतात.
म्हणूनच म्हण पडली आहे की, *प्रपंचात वित्त व परमार्थात चित्त चांगले स्थिर पाहिजे.* कारण वित्ताने प्रपंच उत्तम करून जगात वाहवा मिळते व चित्ताने हे सर्व विष्णुमय आहे, असे चिंतन झाल्यावर परमार्थात श्रेष्ठ अवस्था प्राप्त होते. असे झाले तरच तो 'ज्ञानी' म्हटला जातो व हे नाही झाले तर तो 'करंटा' ठरतो. *कारण अद्वैताची वाट सापडल्याशिवाय, विष्णू हे सर्वव्यापी तत्त्व आहे हे कळणार नाही.* आणि असे झाले तर की काय होईल? तेच माउली कडव्याच्या उत्तरार्धातून सांगतात. ते आपण उद्या पाहू. 
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates