19 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८३ ॥*

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या आठव्या अभंगाच्या शेवटच्या चरणात फार महत्त्वाचा संदर्भ सांगताना म्हणतात, *"ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥हरि.८.६॥"*
या चरणाचा गर्भितार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "सद्गुरु श्री माउली सांगतात की, नाम हे अतिसुलभ आहे. असे असताना संतमहात्मे का म्हणतात की, *"अमृताहूनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां बा नेघे ॥स.सं.ना.१४८४.१॥"* श्रीभगवंतांचे नाम अमृताहून गोड असून, माझ्या मुखी का येत नाही? याचाच खुलासा सद्गुरु श्री माउली शेवटच्या कडव्याच्या उत्तरार्धात करतात. *"सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥"* कारण नाम हे जरी सुलभ असले, तरी ते सर्वत्र दुर्लभ होऊन बसलेले आहे. याला कारण, ते जो जाणतो तो विरळा आहे आणि असा विरळा असलेला आपल्याला मिळाल्याशिवाय, ते आपल्याला कळणार नाही !
असे ते नाम यथार्थपणे जाणणारे परंपरेने आलेले सद्गुरु आपल्याला भेटल्याशिवाय व त्यांची कृपा झाल्याशिवाय ते नाम आपल्याला समग्रपणे कळतच नाही. म्हणूनच माउली त्या दिव्यनामाला 'सर्वत्र दुर्लभ' असे म्हणतात.
नाम दुर्लभ असण्याचे आणखीही एक कारण प.पू.श्री.मामा सांगतात, ते आपण उद्या पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates