28 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९१ ॥*

हरिपाठाच्या नवव्या अभंगात सद्गुरु श्री माउली म्हणतात की, सर्वव्यापी तत्त्वाचे ज्ञान झाल्याशिवाय केलेला जप व्यर्थ होय. तसेच एकदेशीय जपज्ञान किंवा माहात्म्यज्ञान हेही व्यर्थच म्हणायला हवे. असा अर्थ कशावरून काढला? प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात माउली स्वत:च तसे सूचित करतात की, *"रामकृष्णीं मन नाही ज्याचें ॥हरि.९.१॥"*
राम हा अलग, कृष्ण हा अलग व पंढरीचा पांडुरंग हा अलग; असे मानणारे वादविवाद करत बसतात. त्यांना तो खुशाल घालू द्यावा, आपण मात्र समजावे की, सर्व विष्णूंचेच अवतार अाहेत.
कारण साधकाच्या ठिकाणी हे माहात्म्यज्ञान कधीच एकदेशी नसावे. सर्वव्यापक तत्त्व एकच आहे ना, त्याशिवाय सर्वव्यापी कसे ठरणार ते? म्हणून आपण हा भेद कधीच बाळगू नये, असा पू.मामा आपल्याला मन:पूर्वक उपदेश करतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates