5 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६९ ॥*

( पूर्वसूत्र : सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठातील *"संतांचे संगति मनोमार्ग गती ।"* या आठव्या अभंगाचे प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी केलेले विवरण आपण पाहात आहोत. संत कोण? या प्रश्नाचे पू.मामा सविस्तर विवेचन करीत आहेत.)
महात्म्यांच्या अंतरंगात चालणा-या संकीर्तनभक्तीचे युद्ध-रूपकाच्या माध्यमातून वर्णन करताना सद्गुरु श्री माउली पुढे सांगतात की, "महात्म्यांची इंद्रिये त्यांना वश होऊन राहतात. त्यानंतर धारणेचे घोडदळ पुढे सरकते. महाभूतांची सेना एकत्र होते आणि मनाच्या संकल्परूप शत्रूचा पूर्ण नि:पात करते. त्यामुळे ध्यानाची सिद्धी होऊ लागून, विजयाची वाद्ये वाजू लागतात, तन्मयतेचे एकछत्री राज्य सुरू झाल्याचे द्योतक असणारे विजयध्वज फडकू लागतात; आणि समाधिसुखाचे ऐश्वर्य प्राप्त होऊन त्या महात्म्यावर आत्मानुभवाच्या गादीचा राज्याभिषेक संपन्न होते. त्याद्वारे त्याला समरसतेचे संपूर्ण साम्राज्य प्राप्त होते. असे हे श्रीभगवंतांचे गूढ भजन आहे."
श्रीभगवंतांच्या व सद्गुरूंच्या कृपेने महात्म्यांना अनुभवाला येणा-या आत्मसाक्षात्काराची समग्र प्रक्रियाच येथे श्री माउलींनी स्पष्ट करून सांगितलेली आहे. या निगूढ गुरवी भक्तीने म्हणजेच श्रीगुरुकृपेने लाभलेल्या भक्तीने महात्मे सर्वांगाने हरिरूपच होऊन ठाकतात. किंबहुना असे समरस झालेले महात्मेच खरे संत होत !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates