Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

30 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *३० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९३॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात म्हणतात, *"रामकृष्णीं पैठा कैसेनि होय ॥हरि.९.२॥"* या चरणाच्या विवरणात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज नामस्मरणाच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा व फारसा कुठेही न आलेला एक मौलिक सिद्धांत स्पष्ट करून सांगतात. पू.मामा म्हणतात, "असा नियम आहे की, मूळ *'ॐ तत् सत्'* हे तत्त्व आहे, अगर मूळ मंत्र आहे. माउलींनी त्याचेच स्वरूप...
Read More

29 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९२ ॥*

श्रीराम व श्रीकृष्ण हे भिन्न नाहीत. ते एकाच श्रीविष्णूंचे अवतार असून, कार्य पूर्ण झाले की पुन्हा त्या विष्णूंप्रतच जातात. हेच माउली अभंगाच्या दुस-या चरणात सांगतात की, *"उपजोनि करंटा नेणें अद्वय वाटा ।* *रामकृष्णीं पैठा कैैसेनि होय ॥हरि.९.२॥"* याचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, प्राणिमात्र या जगात जन्मास येतो; म्हणजेच उपजतो. परंतु त्यास जर आल्याची वाट माहीत नसेल, तर...
Read More

28 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९१ ॥*

हरिपाठाच्या नवव्या अभंगात सद्गुरु श्री माउली म्हणतात की, सर्वव्यापी तत्त्वाचे ज्ञान झाल्याशिवाय केलेला जप व्यर्थ होय. तसेच एकदेशीय जपज्ञान किंवा माहात्म्यज्ञान हेही व्यर्थच म्हणायला हवे. असा अर्थ कशावरून काढला? प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात माउली स्वत:च तसे सूचित करतात की, *"रामकृष्णीं मन नाही ज्याचें ॥हरि.९.१॥"* राम हा अलग, कृष्ण हा अलग व पंढरीचा पांडुरंग...
Read More

27 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९० ॥*

भगवान श्री वामनांनी, "तिसरे पाऊल कुठे ठेवू?" असे विचारल्यावर, बली राजाने आपले मस्तक झुकवले व त्यावर पाऊल ठेवायची विनंती केली. कारण बली हा ज्ञानीभक्त होता. मी देह नसून देही आहे, हे तो यथार्थ जाणत होता. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून देह बनलेला आहे; तर त्या देहात नांदणारा, त्या देहातील देही जो जीव, तो तर ब्रह्माचाच अंश असल्याने तो कधीच त्या देहात विलीन होऊ शकत नाही. तेव्हा भगवंतांनी...
Read More

26 June 2017

॥ अमृतबोध ॥२६ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८९ ॥

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की, "विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।" याचा गूढार्थ सांगण्यासाठी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज श्रीभगवंतांच्या श्री वामन अवताराचे उदाहरण घेतात. बटू वामन बलीच्या यज्ञाच्या ठिकाणी आले. त्यांनी बलीकडे तीन पावले जमीन मागितली. ती मिळताच, एका पावलात सप्त स्वर्ग व्यापले,  दुस-या पावलात सप्त पाताळ व्यापल्यावर,...
Read More

25 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८८ ॥*

*प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज जयंती  !!* प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठातील नवव्या अभंगाची प्रस्तावना करताना म्हणतात, "सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील हा मोठा गोड अभंग आहे. तसे पाहिले तर, सर्वच अभंग एकापेक्षा एक असे वरचढ अाहेत. परंतु...
Read More

24 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८७ ॥*

हरिपाठाच्या नवव्या अभंगाचा उर्वरित सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "श्रीसद्गुरूंच्या उपदेशावाचून ज्ञान होणार नाही; आणि त्या ज्ञानाशिवाय द्वैतभ्रांती जाणार नाही. अपरोक्ष ज्ञानानुभव होण्यासाठी ईश्वराच्या सगुण-स्वरूपाचे नित्य ध्यान जडले पाहिजे. तसेच मी-तू पणाची सर्व भाषा संपून, अखंड नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे; असे श्री ज्ञानेश्वर महाराज येथे स्पष्ट सांगतात. " मी (जीव)...
Read More

23 June 2017

॥ अमृतबोध ॥२३ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८६ ॥

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या नवव्या अभंगात दुर्दैवी अभक्तांविषयी खेद व्यक्त करतात. या अभंगाचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "कितीही ज्ञानी असला तरी, महाविष्णू श्रीहरींच्या रामकृष्णादी सगुण अवतारांच्या लीला गाण्यात आणि त्यांचे नामस्मरण करण्यात ज्यांचे...
Read More

22 June 2017

॥ अमृतबोध ॥ २२ जून २०१७

सर्वत्र दुर्लभ असणारे नाम खरेतर सुलभ असल्याचा अनुभव कसा येतो, हे सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "श्रीगुरूंची सेवा करून, त्यांच्याकडून ते शक्तियुक्त, दुर्लभ नाम मिळते. मग प्रेमाने, श्रद्धेने व आदराने साधना झाल्यावर, तेच नाम किती सुलभ आहे याचा अनुभव येतो. इतकेच नाही तर ते घ्यावेही...
Read More

21 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२१ जून २०१७* *॥ अमृतबोध-वर्षपूर्ती ॥*

प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या असीम दयाकृपेने, गेल्यावर्षी २१ जून रोजी *॥ अमृतबोध ॥* पोस्ट करायला सुरुवात झाली. सद्गुरुकृपेने आज या सेवेला एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षभरात केवळ दोन दिवस सोडता सातत्याने अमृतबोध पोस्ट झाले, ही देखील सद्गुरूंची कृपाच होय. आजवर अनेकानेक वाचकांनी...
Read More

20 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८४ ॥*

श्रीभगवंतांचे नाम सुलभ असूनही सर्वत्र दुर्लभ होऊन बसलेले आहे, असे सद्गुरु श्री माउली म्हणतात. याचे आणखी एक कारण सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "नाम जरी आपल्याला माहीत असले, तरी ते उच्चारायचे कसे? हेही माहीत असावे लागते. ते योग्य उच्चारणच कष्टाचे ठरत असल्यामुळेही नाम दुर्लभ झालेले...
Read More

19 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८३ ॥*

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या आठव्या अभंगाच्या शेवटच्या चरणात फार महत्त्वाचा संदर्भ सांगताना म्हणतात, *"ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥हरि.८.६॥"* या चरणाचा गर्भितार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "सद्गुरु श्री माउली सांगतात की, नाम हे...
Read More

18 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८२ ॥*

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, "रणांगणावर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी, *'माम् अनुस्मर युध्य च ।'* असा उपदेश केला; तीच *'श्रीमद् भगवद्गीता'* झाली व सख्या उद्धवाला, 'माझे स्मरण करून गृहस्थाश्रम कसा नीट करावा?' ते सांगितले; तेच *'श्रीमद् भागवत'* झाले." भगवान श्रीकृष्णांनी अर्जुन व उद्धव...
Read More

17 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८१ ॥*

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज भक्तराज प्रल्हादांची गोष्ट पुढे सांगतात की, कयाधु ही हिरण्यकश्यपूची नावडती राणी असल्याने ती अरण्यात वास करून होती. त्यावेळी तिने प्रभूंचा धावा केला. तेव्हा देवर्षी नारदमुनींनी येऊन तिला शक्तियुक्त नाम दिले व ज्ञान सांगितले. ते सर्व गर्भात असलेल्या प्रल्हादाने ऐकले...
Read More

16 June 2017

॥ अमृतबोध ॥ १६ जून २०१७

॥ अमृतबोध ॥ १६ जून २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १८० ॥ हरिपाठाच्या आठव्या अभंगातील पाचव्या चरणात सद्गुरु श्री माउली पुराणातील महत्त्वाच्या कथेचा उल्लेख करताना म्हणतात, "सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला ।(हरि.८.५)"याच्या स्पष्टीकरणासाठी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी पुराणातील एक कथा सांगत असत.एकदा सनत्कुमार भगवान विष्णूंकडे जावयास निघाले. तेथे सातव्या कक्षेतील देवांच्या...
Read More

15 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७९ ॥*

हरिपाठाच्या आठव्या अभंगातील चवथ्या चरणाच्या उत्तरार्धात सद्गुरु श्री माउली योग्यांचे वर्णन करताना म्हणतात, *"योगियां साधिली जीवनकळा ॥हरि.८.४॥"* याचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, येथे योगी याचा अर्थ 'हठयोगी' असा घेण्याचे काहीच कारण नाही. योगी म्हणजे जो परमात्म्याशी जोडलेला आहे, एकरूप झालेला आहे तो. मुळात जीवात्मा परमात्म्यापासून कधीच अलग होऊ शकत नाही. माउली सांगतात की,...
Read More

14 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *१४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७८ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या आठव्या अभंगातील चवथ्या चरणात म्हणतात, *'नामामृत गोडी वैष्णवां लाधली ।(हरि.८.४)'* वैष्णवांना नामरूपी अमृताची गोडी प्राप्त झाली. याचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, नाम हेच अमृत आहे; का नाम घेता घेता श्रीगुरु भेटले व त्यांनी साधन सांगितले; ते साधन करता करता अमृताचा अनुभव आला? यावर विचार करायला हवा. कारण, मुखाने जरी नाम घेतले, पण मनात दुसरेच...
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © 2025 Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates