14 September 2016

॥ अमृतबोध ॥ १४ सप्टेंबर २०१६


काम, क्रोध व लोभ या तीन दुर्गुणांना भगवान श्रीकृष्णांनी श्रीगीतेत ' नरकाचे द्वार ' म्हटलेले आहे. भगवान श्रीमाउलींनी सोळाव्या अध्यायातील त्या श्लोकांवर श्रीज्ञानेश्वरीत फारच मार्मिक व विस्तृत लिहिलेले आहे. त्याच विवरणाचे सार सांगताना, प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज अवघ्या एकाच वाक्यात प्रचंड अर्थ असणारा बोध करतात की, लोभच यच्चयावत् सर्व पापांचे मूळ आहे. अंत:करणात लोभ असला की तो आपल्याला काहीही सुचू देत नाही व त्या लोभाची पूर्ती होईपर्यंत आपला सदसद् विवेकही नष्ट करून टाकतो. लोभाच्या आहारी गेलेला माणूस कधीच समजुतदारपणे वागू शकत नाही. अक्षरश: अंगावर काटा येईल अशी भयानक कृत्ये करायला लावून लोभ त्याचे पूर्ण वाटोळे करूनच शांत होत असतो. लोभाचा हा दुर्गुण सहजतेने फायद्यात बदलण्याचाही सोपा पण प्रयत्नसाध्य मार्ग प. पू. श्री. मामा सांगतात की; लोभ असावा, पण ईश्वरभजनी असावा.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates