28 September 2016

॥ अमृतबोध ॥ २८ सप्टेंबर २०१६

क्रोध हा कोणालाही पटकन् आवरता न येणारा दुर्गुण आहे. क्रोध येतो तेव्हा आपला सारासारविचार नष्ट होत असतो, म्हणूनच क्रोधाचे दुष्परिणाम फार भयंकर होतात. आपल्या सर्वस्वाची हानी करणारा हाच क्रोध जर आपण सुयोग्य ठिकाणी व सुयोग्य प्रकारे वापरू शकलो, तर तोच आपल्याला परम लाभदायकही ठरू शकतो. कसा? ते सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, एखाद्या संतापी, क्रोधी माणसाला असतो तसाच तीव्र व न आवरता येणारा क्रोध, विषयांच्या आहारी जाण्याविषयी आपल्या मनात असावा. म्हणजे मग त्या विषयांपुढे हतबल होऊन आपल्या हातून कधीच चुकीचे वर्तन होत नाही. आपले हानिकारक दुर्गुण सुद्धा योग्य प्रकारे वापरून, त्यातून आपलाच शाश्वत लाभ करून देण्याची कला फक्त संतांनाच अवगत असते. म्हणूनच परमार्थात संतसंगतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates