26 September 2016

॥ अमृतबोध ॥ २६ सप्टेंबर २०१६

प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री पू. पार्वतीदेवी या श्रीस्वामी समर्थ महाराजांची परमकृपा लाभलेल्या फार थोर विभूतिमत्व होत्या. त्यांचे बोल इतके विलक्षण असत की ज्याचे नाव ते. त्यांच्याच मुशीत तयार झाल्याने पू. मामा देखील दररोजच्या, आपल्या ओळखीच्या उदाहरणांतून कठीण परमार्थ अगदी सोपा करून सांगत असत. आजपासून पुढील तीन अमृतबोध हे त्यादृष्टीने विशेष चिंतनीय ठरावेत.
आपल्या दुर्गुणांचाही सुयोग्य पद्धतीने वापर केल्यास तेही लाभदायकच ठरतात, कसे? तर पू. मामा म्हणतात, लोभ घालवणे आपल्याला सहज शक्य नाही ना, मग त्या लोभाचे स्वरूपच बदलून टाकावे. धन संपत्ती वगैरे संपणा-या गोष्टींचा लोभ ठेवण्यापेक्षा,  कंजूष माणसाला पैशांबद्दल जसा तीव्र लोभ असतो, अगदी तसाच आपण शाश्वत अशा श्रीभगवंतांच्या विषयी तरी ठेवावा. यासाठीच पू. मातु:श्री म्हणत, " लोभ असावा ईश्वरभजनी । " म्हणजे मग नाना संकटांमध्ये अडकवणारा तोच लोभ, संकटांची परंपराच नष्ट करणारा ठरतो ! प. पू. श्री. मामांचे सांगणे हे असे असे, कायम सकारात्मक, लाभदायक व परमहितकारक !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates