23 September 2016

॥ अमृतबोध ॥ २३ सप्टेंबर २०१६

संत आपल्या विचारभूमिकांमध्ये अतिशय स्पष्ट व नेमके असतात. संतांचे शब्द हे प्रचंड अभ्यासाचा, साधनेचा परिपाकच असतात. म्हणूनच त्यांचे ठोकताळेही फार विलक्षण असतात.
साधकाने आपले आत्मपरीक्षण करताना काय निकष लावावेत, याचा सुरेख संदर्भ प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधातून देत आहेत.
प्रपंचातील घडामोडींनी मन अशांत होण्याचे प्रसंग सर्वांवरच कधी ना कधी येत असतात. पण ते तसे अशांत मन हे श्रीभगवंतांच्या विस्मरणाचेच फळ आहे, हे पक्के लक्षात ठेवावे. कारण श्रीभगवंत हे परमशांत आहेत, स्थिर आहेत; त्यामुळे जेथे त्यांचे अखंडित स्मरण असते, तेथे शांती व समाधान निरंतर वास करून असतातच. आपले मन अशांत झाले, चिंता किंवा दु:खाच्या वृत्तीने ते चंचल झाले की स्पष्ट समजावे, आपल्याला देवांचे विस्मरण झालेले आहे. तत्काळ मनाला बजावून पुन्हा श्रीभगवंतांशी जोडून टाकावे, जादूची कांडी फिरवल्यासारखे मन शांत होऊन जाते. असे शांत मन हेच सुखी जीवनाचे गमक आहे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates