29 September 2016

॥ अमृतबोध ॥ २९ सप्टेंबर २०१६

एकदा एक विलक्षण प्रसंग घडला होता. प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांना विचारले, " मामा, ' भावबळें आकळ ए-हवी नाकळे । ' असे श्रीमाउली म्हणतात, त्यातील 'भावबळे'चा नेमका अर्थ काय? " त्यावर पू. मामा म्हणाले, " ती समोर गादीवर माझी शबनम दिसते ना, त्यात काही आहे का पहा जरा." पू. दादांनी पाहिले, ती रिकामी होती. मग पू. मामा म्हणाले, " त्यात आता पेढे आहेत असा तू मनात भाव धर आणि पाहा जाऊन. " पू. दादांनी तसे केले. पण त्या पिशवीत काहीच नव्हते. ते पुन्हा पू. मामांपाशी येऊन बसले. त्यानंतर पू. मामा म्हणाले, " आता पुन्हा तू तसाच भाव मनात धर, आम्ही तुझ्या भावाला बळ देतो." पू. दादांनी पुन्हा भाव धरला, पू. मामांनी त्यांचे बळ दिले व जाऊन पाहायला सांगितले. आश्चर्य म्हणजे खरोखरीच त्या शबनम मध्ये पेढ्यांचा पुडा होता. हे पाहून चकित झालेल्या पू. दादांना पू. मामा म्हणाले, " यालाच म्हणतात, ' भावबळें आकळे ए-हवी नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरि ॥हरि.१२.२॥' शिष्याच्या मनात साधनेने आलेल्या शुद्ध भावाला जेव्हा श्रीसद्गुरूंच्या कृपेचे बळ मिळते, तेव्हाच निर्गुण असा परमात्माही त्या शिष्याला हातावर ठेवलेल्या आवळ्यासारखा स्पष्ट जाणवतो. प. पू. मामा नुसते शब्दांनी सांगत नसत, तर तशी प्रत्यक्ष अनुभूतीच आणून देत असत !
प. पू. मामांनी पू. दादांना अशा विलक्षण पद्धतीने कृपापूर्वक अनुभवाला आणून दिलेला तोच परमार्थ-सिद्धांत आजच्या अमृतबोधातून शब्दबद्ध झालेला आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates