20 September 2016

॥ अमृतबोध ॥ २० सप्टेंबर २०१६

काळजी करणे आणि काळजी घेणे हे दोन वरकरणी सारखे वाटतात, पण त्यात फार भेद आहे. सतत काळजी करणे, हा मनुष्यस्वभावच आहे. पण खरेतर काळजी घेणे, हेच योग्य वागणे आहे. काळजी करण्याने कोणतेच काम साधत नाही, उलट बिघडतेच. पण काळजी घेण्याने मात्र सर्व कामे सुलभ व सोपी होतात. म्हणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, दररोजच्या जीवनात उगीचच काळजी करण्याचे सोडून, वेळच्या वेळी आवश्यक ती काळजी घ्यायची सवय लावून घेतली, तर प्रपंच काही प्रमाणात सुखदायक होऊ शकतो. आणि  हेच साधनेत बरोबर उलटे आहे. सर्व प्रकारच्या काळज्या मिटवण्यासाठीच श्रीसद्गुरु कृपापूर्वक साधना देत असतात, म्हणून त्यात मात्र काळजी सोडून 'स्वस्थ' बसावे. आपण परमात्म्याचेच अंश आहोत, म्हणजे आपला ' स्व ' हा त्याचेच द्योतक आहे, म्हणून त्या ' स्व ' मध्ये रममाण होणे हेच स्वस्थ बसणे होय. साधनेत असे स्वस्थ बसल्याने, व्यवहारातही काळजी करण्याची मग आवश्यकताच उरत नाही !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates