24 September 2016

॥ अमृतबोध ॥ २४ सप्टेंबर २०१६

सुखाचे दोन दुष्ट मित्र आहेत, ते  कायम त्यासोबत येतातच. सुख आले की त्या पाठोपाठ आळस आणि माज येतोच. ज्या प्रयत्नांमुळे ते सुख लाभलेले असते त्या प्रयत्नांवरच पहिल्यांदा हा आळस मारा करतो आणि ते प्रयत्न मंदावले की हळूहळू सुखही संपून जाते. शिवाय सुखातला माज, त्या सुखाचे कर्ते आपणच आहोत, ही खोटी भावनाही मनात तीव्रतेने निर्माण करतो. मग ज्या श्रीभगवंतांच्या कृपेने ते सुख लाभलेले अाहे, त्यांनाच आपण सोयिस्करपणे विसरतो. या दोन्हींमुळे सुखाला गालबोट लागते.
यासाठीच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, प्रापंचिक व सांसारिक सुखांची करमरता असली की आपोआपच हे दोन्ही दुर्गुण आपल्या चित्तात येऊन खळबळ माजवत नाहीत. आणि सुखात जेवढे देवांचे स्मरण आपल्याला होते, त्यापेक्षा जास्त दु:खात, उणीवांमध्येच होत असते. म्हणूनच तशी कमतरता असणे, हे श्रीभगवंतांच्या कृपेचेच द्योतक आहे, असेच खरे भगवद् भक्त मनोमन जाणून जीवनातील दु:खांचा, कमतरतेचा आनंदानेच
स्वीकार करतात. श्रीभगवंतांचे स्मरण सतत टिकून राहावे, यासाठीच आपल्याला प्रापंचिक उणीवाची शिदोरी त्यांनी बरोबर दिलेली आहे, हीच भगवंतांची आपल्यावरील मोठी प्रेमकृपा नाही का?
येथे प. पू. मामासाहेब प्रपंचात सुख मिळवण्याचे प्रयत्न थांबवा, असे अजिबात म्हणत नाहीत, फक्त त्या उणीवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे ते सांगत आहेत. या दृष्टीने पाहिल्यास आपले समाधान टिकून राहते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates