सुखाचे दोन दुष्ट मित्र आहेत, ते कायम त्यासोबत येतातच. सुख आले की त्या पाठोपाठ आळस आणि माज येतोच. ज्या प्रयत्नांमुळे ते सुख लाभलेले असते त्या प्रयत्नांवरच पहिल्यांदा हा आळस मारा करतो आणि ते प्रयत्न मंदावले की हळूहळू सुखही संपून जाते. शिवाय सुखातला माज, त्या सुखाचे कर्ते आपणच आहोत, ही खोटी भावनाही मनात तीव्रतेने निर्माण करतो. मग ज्या श्रीभगवंतांच्या कृपेने ते सुख लाभलेले अाहे, त्यांनाच आपण सोयिस्करपणे विसरतो. या दोन्हींमुळे सुखाला गालबोट लागते.
यासाठीच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, प्रापंचिक व सांसारिक सुखांची करमरता असली की आपोआपच हे दोन्ही दुर्गुण आपल्या चित्तात येऊन खळबळ माजवत नाहीत. आणि सुखात जेवढे देवांचे स्मरण आपल्याला होते, त्यापेक्षा जास्त दु:खात, उणीवांमध्येच होत असते. म्हणूनच तशी कमतरता असणे, हे श्रीभगवंतांच्या कृपेचेच द्योतक आहे, असेच खरे भगवद् भक्त मनोमन जाणून जीवनातील दु:खांचा, कमतरतेचा आनंदानेच
स्वीकार करतात. श्रीभगवंतांचे स्मरण सतत टिकून राहावे, यासाठीच आपल्याला प्रापंचिक उणीवाची शिदोरी त्यांनी बरोबर दिलेली आहे, हीच भगवंतांची आपल्यावरील मोठी प्रेमकृपा नाही का?
येथे प. पू. मामासाहेब प्रपंचात सुख मिळवण्याचे प्रयत्न थांबवा, असे अजिबात म्हणत नाहीत, फक्त त्या उणीवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे ते सांगत आहेत. या दृष्टीने पाहिल्यास आपले समाधान टिकून राहते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
24 September 2016
॥ अमृतबोध ॥ २४ सप्टेंबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
भजनाचा गूढ अर्थ : राधा गवळण करिते मंथन । अविरत हरिचे मनात चिंतन ॥ श्रीमद् भागवतात कुठेही 'राधा' किंवा 'राधाकृष्ण' या नावांचा...
-
शक्तिजागृतीची मागणी हाच 'जोगवा' : ती महाशक्ती श्रीसद्गुरुकृपेने प्रकट झाल्यानंतर त्रिविध तापांची समूळ झाडणी करते. त्यामुळेच श्रीसंत ...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
September
(30)
- ॥ अमृतबोध ॥३० सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २७ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २६ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २५ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २३ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २० सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १८ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १७ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १५ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ११ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १० सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥९ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ५ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २ सप्टेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १ सप्टेंबर २०१६
-
▼
September
(30)
0 comments:
Post a Comment