25 September 2016

॥ अमृतबोध ॥ २५ सप्टेंबर २०१६

इतर लोकांना दाखवल्याशिवाय, सांगितल्याशिवाय आपण काहीही कधी करूच शकत नाही. इतकी आपल्याला या नसत्या दिखावूपणाची सवयच झालेली असते. आणि आता फेसबुक, व्हॉटसपच्या जमान्यात तर बोलूच नका.
पण परमार्थ ही तर अंतरंग गोष्ट आहे, दाखवायची नाही. या आपल्या सवयीमुळे तो हृदयाच्या गाभ्यात अनुभवायचा परमार्थही आपण गावाच्या चव्हाट्यावर कधी आणून ठेवतो, हे आपले आपल्यालाही कळत नाही. मग त्या श्रीभगवंतांपर्यंत नेणा-या निष्कळ भक्तीचाही बाजारच होऊन जातो आणि भगवंत कधीच त्यातून दूर निघून जातात. या फार महत्त्वाच्या गोष्टीकडे आपले लक्ष वेधून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आपल्याला जाणीव करून देतात की, इतरांनी चांगले म्हणावे, मान द्यावा म्हणून कधीही परमार्थ करू नये. नाहीतर ते नाटकच ठरते व त्याद्वारे श्रीभगवंतांची प्राप्ती कदापि होत नाही. परमार्थ हा केवळ श्रीभगवंतांच्या निष्कपट व निष्काम सेवेसाठीच करावा, त्यांच्या निरपेक्ष भजनासाठीच करावा आणि तोही आपल्या पाचवीला पुजलेला सगळा आळस झटकून करावा ! तरच तो त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना आपली दया येते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates