19 September 2016

॥ अमृतबोध ॥ १९ सप्टेंबर २०१६


परमार्थात सहजतेला खूप महत्त्व असते. काहीही मारून मुटकून केलेले परमार्थात ग्राह्य धरले जात नाही, कारण ते कधीच चिरस्थायी नसते. शेवटी उसने आणलेले अवसान किती काळ टिकणार ना?
आपल्या मनी मानसी मुरलेल्या विषयांचेही तसेच असते. मी सोडले म्हणून खरेतर काहीही सुटत नसते. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यथार्थतेची जाणीव करून देत सांगतात की, आपल्या मनातले विषय आतूनच सुटले पाहिजेत, मुद्दाम ठरवून सोडलेला विषय हा वासनाक्षय मानला जात नाही. माकड शांत बसले म्हणून त्याच्या माकडचेष्टा कायमच्या संपल्या असे होते का? थोड्या वेळाने येरे माझ्या मागल्या होणारच त्याचे. इकडे कडकडीत निर्जली उपास करायचा पण मनात मात्र जेवणावळींचा विचार करायचा किंवा स्वप्नात जेवणच पहायचे, हा काही वासनाक्षय नाही. एखादी गोष्ट सुटली तर मग मनात देखील ती गोष्ट येता कामा नये. यासाठी आपल्याकडून भरपूर साधनाच व्हावी लागते. अशक्य नसले तरी सहज शक्य देखील नाही हे. मनापासून प्रयत्न करण्याची तयारी, पक्का निर्धार आणि आपल्या श्रीसद्गुरूंवर व त्यांनी दिलेल्या साधनेवर निष्ठा असल्यास हे नक्कीच अवघड वाटणार नाही !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates