14 November 2016

॥ अमृतबोध ॥ १४ नोव्हेंबर २०१६

मनुष्याच्या हातून घडणारे प्रत्येक पापकर्म तीन प्रकारचे असते. वाल्मीकी रामायणाचा संदर्भ देऊन प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी ते स्पष्ट करून सांगितलेले आहे. आजपासून तीन दिवस आपण त्या तीन प्रकारांचा परामर्ष घेऊया.
प. पू. श्री. मामा पापकर्मांचे रहस्य सांगताना म्हणतात, " पापकर्म तीन प्रकारचे असते. मनुष्याचा पापाचा निश्चय प्रथम अंत:करणात होत असतो. " कोणतेही पाप आधी आपल्या मन, बुद्धी, चित्त व अहंकार या अंत:करण चतुष्टयात जन्माला येते. मनातील पापवृत्तीला बुद्धी योग्य ठरवते व अहंकार त्याला अनुमोदन देतो. चित्त त्याचे चिंतन करून त्यात वाढ करते. अशाप्रकारे पापाचा प्रथम निश्चय आपल्या मनातच होत असतो. हेच मानसिक पापकर्म होय. याच वेळी जर ते पाप टळले तर पुढील अनर्थही आपोआप टळतात. पण हे होण्यासाठी श्रीगुरुकृपेची व अंत:करणाच्या शुद्धीची आवश्यकता असते. श्रीभगवंतांची मोठी दया की, या मानसिक पापकर्मांना कलियुगात गौण मानले जाते, त्यांचा मनुष्याला तेवढा त्रास होत नाही. पण तरीही ते निषिद्धच मानलेले आहे, यात शंका नाही.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates