9 November 2016

॥ अमृतबोध ॥ ९ नोव्हेंबर २०१६

प्रपंच सोडून राम राम म्हणा असे संत कधीच सांगत नाहीत. प्रपंचाचाच परमार्थ करण्याची खुबी मात्र ते आवर्जून शिकवतात.
आजच्या अमृतबोधातून असेच सोपे पण महत्त्वाचे मार्गदर्शन करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " सहलीला जावे की भक्तियात्रेला ? तर भक्तियात्रेलाच जावे. यात्रेत सहल होतेच; पण सहलीत यात्रा होत नाही. "
आपल्या विचारांची भूमिका खूप महत्त्वाची असते. प्रत्येक गोष्टीकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो, हे आपल्या साधकीय प्रगतीसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरत असते. साधी सहलीसारखी गोष्टही केवळ विचारांच्या भूमिकेत केलेल्या बदलाने भक्तियात्रा ठरून सहली बरोबरच परमार्थही साधून देऊ शकते. साधकाने सतत आपल्या साधनेला पोषक असणारीच भूमिका बाळगली पाहिजे, हेच तत्त्व यातून प. पू. श्री. मामा आपल्याला शिकवत आहेत ! 
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates