सर्व शास्त्रे, सर्व संत एकमुखाने सांगतात की, श्रीगुरु हे साक्षात् श्रीभगवंतांचेच स्वरूप असतात. ते मनुष्यरूप दिसले तरी अंतर्बाह्य सच्चिदानंदस्वरूपच असतात. भगवान श्री माउली देखील म्हणतात, " येर माणूसपण हे भांब । लौकिक भाग ॥ " आपल्या पांचभौतिक दृष्टीला तसेच पाहायची सवय असते, म्हणूनच श्रीगुरु आपल्याला मनुष्य वाटतात. पण हा भाव साधनेत फार घातक असतो.
यासाठीच साधकांना व पारमार्थिकांना यथार्थ मार्गदर्शन करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " तीर्थाला सामान्य जल समजणा-याला, मूर्तीला दगड म्हणणा-याला आणि श्रीगुरूंना मनुष्य मानणा-याला शास्त्रांनी पापी व महामूर्ख म्हटलेले आहे. "
श्रीभगवंतांच्या विग्रहाच्या अभिषेकाचे जल हे सामान्य जलच दिसत असले, तरी त्यात प्रचंड सामर्थ्य असते. मूर्ती दगडाची जरी असली, निर्जीव वाटत असली तरी त्यातील देवत्वामुळे ती चिन्मयच मानली पाहिजे. हेच श्रीगुरूंच्याही बाबतीत सत्य असते. ते प्रत्यक्ष शक्तिस्वरूप असतात, चालते बोलते परब्रह्मच असतात. म्हणून या तिन्हींना सामान्य समजणा-या माणसाला शास्त्रे महामूर्ख व पापीच म्हणतात. श्रीसद्गुरूंना मनुष्यरूपात पाहणे, हा शिष्यासाठी महादोषच सांगितलेला आहे. अशी चूक आपल्याकडून कदापि होऊ नये, म्हणूनच प. पू. श्री. मामा येथे आपल्या डोळ्यांत अपूर्व श्रीगुरुप्रेमाचे अमृतमय बोधांजनच घालत आहेत !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
5 November 2016
॥ अमृतबोध ॥ ५ नोव्हेंबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
शक्तिजागृतीची मागणी हाच 'जोगवा' : ती महाशक्ती श्रीसद्गुरुकृपेने प्रकट झाल्यानंतर त्रिविध तापांची समूळ झाडणी करते. त्यामुळेच श्रीसंत ...
-
भजनाचा गूढ अर्थ : राधा गवळण करिते मंथन । अविरत हरिचे मनात चिंतन ॥ श्रीमद् भागवतात कुठेही 'राधा' किंवा 'राधाकृष्ण' या नावांचा...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
November
(30)
- ॥ अमृतबोध ॥ ३० नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२७ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२६ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२५ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२३ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२० नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १८ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१७ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१५ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ११ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१० नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ९ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ५ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १ नोव्हेंबर २०१६
-
▼
November
(30)
0 comments:
Post a Comment