5 November 2016

॥ अमृतबोध ॥ ५ नोव्हेंबर २०१६

सर्व शास्त्रे, सर्व संत एकमुखाने सांगतात की, श्रीगुरु हे साक्षात् श्रीभगवंतांचेच स्वरूप असतात. ते मनुष्यरूप दिसले तरी अंतर्बाह्य सच्चिदानंदस्वरूपच असतात. भगवान श्री माउली देखील म्हणतात, " येर माणूसपण हे भांब । लौकिक भाग ॥ " आपल्या पांचभौतिक दृष्टीला तसेच पाहायची सवय असते, म्हणूनच श्रीगुरु आपल्याला मनुष्य वाटतात. पण हा भाव साधनेत फार घातक असतो.
यासाठीच साधकांना व पारमार्थिकांना यथार्थ मार्गदर्शन करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " तीर्थाला सामान्य जल समजणा-याला, मूर्तीला दगड म्हणणा-याला आणि श्रीगुरूंना मनुष्य मानणा-याला शास्त्रांनी पापी व महामूर्ख म्हटलेले आहे. "
श्रीभगवंतांच्या विग्रहाच्या अभिषेकाचे जल हे सामान्य जलच दिसत असले, तरी त्यात प्रचंड सामर्थ्य असते. मूर्ती दगडाची जरी असली, निर्जीव वाटत असली तरी त्यातील देवत्वामुळे ती चिन्मयच मानली पाहिजे. हेच श्रीगुरूंच्याही बाबतीत सत्य असते. ते प्रत्यक्ष शक्तिस्वरूप असतात, चालते बोलते परब्रह्मच असतात. म्हणून या तिन्हींना सामान्य समजणा-या माणसाला शास्त्रे महामूर्ख व पापीच म्हणतात. श्रीसद्गुरूंना मनुष्यरूपात पाहणे, हा शिष्यासाठी महादोषच सांगितलेला आहे. अशी चूक आपल्याकडून कदापि होऊ नये, म्हणूनच प. पू. श्री. मामा येथे आपल्या डोळ्यांत अपूर्व  श्रीगुरुप्रेमाचे अमृतमय बोधांजनच घालत आहेत !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates