2 November 2016

॥ अमृतबोध ॥ २ नोव्हेंबर २०१६

संतांचे सांगणे हे अगदी नेमके व चपखल असते. कारण ते स्वत:चा अनुभवच प्रत्येकवेळी सांगत असतात. म्हणूनच त्यांचे सांगणे व इकडचे तिकडचे वाचून पोपटपंची करणा-या इतर लेखक-वक्त्यांचे सांगणे यात जमीन-आस्मानाचा फरक असतो.
प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे असे नेमके सांगण्याची हातोटी फार वैशिष्ट्यपूर्ण अाहे. श्रीसद्गुरूंविषयी सांगताना ते म्हणतात की, " सर्वच संत सद्गुरुस्वरूप असतात. पण ज्याप्रमाणे सर्वच स्त्रिया मातेसमान असूनही जन्मदात्री एकच असते; तसेच मोक्षप्राप्ती करवून देणारे सद्गुरूही एकच असतात. "
शिष्याच्या हृदयात सर्व संतांविषयी सद्गुरुभावना असली पाहिजे, पण ते आपल्याच सद्गुरूंचे स्वरूप आहेत अशी. आपले सद्गुरु हे आपले सर्वस्वच झाले पाहिजेत. लहान बाळाला भूक लागली तर समोर कितीही आया असल्या तरी जसे त्याची भूक फक्त त्याचीच जन्मदात्री भागवू शकते; तसेच परमार्थातही होते. सर्वच संत मोठे असले तरी मोक्ष केवळ आपल्याच श्रीसद्गुरूंच्या कृपेने लाभतो ! 
प. पू. श्री. मामा येथे सद्गुरूंप्रति असाव्या लागणा-या शिष्याच्या दृढ शरणागतीचाच पुरस्कार करून, आपल्या हृदयात तो बोध पक्का ठसवत आहेत. ही अनन्य शरणागतीच शिष्याला परमार्थातील सर्वोच्च अनुभूती मिळवून देत असते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates