22 November 2016

॥ अमृतबोध ॥ २२ नोव्हेंबर २०१६

पूर्वी विहिरीवर रहाट असत. आता ते लोकांना पाहायलाही मिळत नाहीत. या रहाटावरून कळशीने पाणी काढण्याच्या रूपकाचा, प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी साधनेच्या दृष्टीने सांगितलेला भावार्थ आपण पाहात आहोत.
आपल्यापाशी बळ नसेल तर दुस-याचे उसने बळ घेऊन ती कळशी खेचावी लागते. पण तरी देखील किती खेचावी ह्याचे प्रमाणही कळावे लागते. पू. मामा म्हणतात की, जर जास्त खेचली तर ती कळशी रहाटावर चढते. कळशी बरोबर विहिरीच्या वर आली की हाताने धरून सोडवून घ्यायची असते. म्हणजे नुसते बळ मिळून चालत नाही, युक्ती पण कळावी लागते. म्हणूनच प. पू. श्री. मामा म्हणतात, " कळशी खेचण्यासाठी बळ उसने मिळाले तरी खेचण्याचे प्रमाणही कळावे लागते. तशी साधनेची युक्ती देखील श्रीगुरूंकडूनच समजून घ्यावी लागते. "
शिष्याने श्रीसद्गुरूंनी जशी सांगितलेली आहे तशीच साधना करायची असते. शिवाय त्यांच्याकडून त्या साधनेची युक्तीही जाणून घेतली की, मग तीच साधना आपल्याला अधिक आनंददायक व सुखकारक होत असते. युक्ती कशी असते त्याचेही पू. मामा सुंदर मार्गदर्शन करतात, ते आपण उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates