पूर्वी विहिरीवर रहाट असत. आता ते लोकांना पाहायलाही मिळत नाहीत. या रहाटावरून कळशीने पाणी काढण्याच्या रूपकाचा, प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी साधनेच्या दृष्टीने सांगितलेला भावार्थ आपण पाहात आहोत.
आपल्यापाशी बळ नसेल तर दुस-याचे उसने बळ घेऊन ती कळशी खेचावी लागते. पण तरी देखील किती खेचावी ह्याचे प्रमाणही कळावे लागते. पू. मामा म्हणतात की, जर जास्त खेचली तर ती कळशी रहाटावर चढते. कळशी बरोबर विहिरीच्या वर आली की हाताने धरून सोडवून घ्यायची असते. म्हणजे नुसते बळ मिळून चालत नाही, युक्ती पण कळावी लागते. म्हणूनच प. पू. श्री. मामा म्हणतात, " कळशी खेचण्यासाठी बळ उसने मिळाले तरी खेचण्याचे प्रमाणही कळावे लागते. तशी साधनेची युक्ती देखील श्रीगुरूंकडूनच समजून घ्यावी लागते. "
शिष्याने श्रीसद्गुरूंनी जशी सांगितलेली आहे तशीच साधना करायची असते. शिवाय त्यांच्याकडून त्या साधनेची युक्तीही जाणून घेतली की, मग तीच साधना आपल्याला अधिक आनंददायक व सुखकारक होत असते. युक्ती कशी असते त्याचेही पू. मामा सुंदर मार्गदर्शन करतात, ते आपण उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
22 November 2016
॥ अमृतबोध ॥ २२ नोव्हेंबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
॥ अमृतबोध ॥ आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव. वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा स...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
॥ अमृतबोध ॥ आज श्रीगुरुपौर्णिमा !! परमानंदस्वरूप श्रीसद्गुरूंच्या पूजनाचा महत्त्वाचा उत्सव. श्रीगुरु हे व्यक्ती नसून तत्त्व असतात. ...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
November
(30)
- ॥ अमृतबोध ॥ ३० नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२७ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२६ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२५ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२३ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२० नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १८ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१७ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१५ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ११ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१० नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ९ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ५ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १ नोव्हेंबर २०१६
-
▼
November
(30)
0 comments:
Post a Comment