21 November 2016

॥ अमृतबोध ॥ २१ नोव्हेंबर २०१६

प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे कळशीचे रूपक आपण पाहात आहोत. पाण्याने भरलेल्या कळशीला लावलेला दोर नेटाने ओढून आपण ती वर घ्यायची असते. त्यासंदर्भात पू. मामा म्हणतात की, " विहिरीतून कळशी बाहेर खेचताना आपल्यापाशी पुरेसे बळ नसेल तर दुस-याचे उसने घ्यावे लागते. तसेच श्रीगुरुकृपेचे असते. "
परमार्थात आपले बळ पुरेसे नसतेच कधी. आपल्या श्रीगुरूंच्या कृपेच्या बळावरच आपला परमार्थ ख-या अर्थाने पूर्णत्वाला जात असतो. प. पू. मामा हेच सांगतात की, जिथे आपले बळ संपते तिथून श्रीगुरुकृपेचे बळ आपल्याला उपयोगी पडत असते. म्हणूनच श्रीगुरु जशी सांगतात तशीच साधना करण्यातच आपला खरा लाभ असतो. त्यांच्याकडून साधनेची युक्ती पण जाणून घ्यायची असते व तीच वापरून पुढे जायचे असते. हे कसे करायचे? तेही प. पू. श्री. मामा छान समजावून सांगतात, ते आपण उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates