3 November 2016

॥ अमृतबोध ॥ ३ नोव्हेंबर २०१६

श्रीगुरूंच्या कृपानुग्रहाशिवाय कधीच सत्य परमार्थ सुरू होत नसतो. पण म्हणून गुरु गुरु करत फिरायचीही गरज नसते. आपण जी काय उपासना करतो तीच प्रेमाने व नेमाने होत राहिली की, पुण्यसंचय होऊन योग्यवेळी आपोआप आपल्या श्रीगुरूंची भेट होऊन त्यांची कृपा होत असते. भगवान श्री माउली " श्रीगुरु आपैसा भेटेचि गा ।" म्हणतात ते याच अर्थाने. ' आपैसा भेटे ' चा अर्थ अनेक वेळा लोक असा करतात की, गुरु शिष्याला शोधत येतात. हे मात्र पूर्ण चूक आहे. नियोजित श्रीगुरूंची व शिष्याची भेट प्रयत्न न करता आपोआपच होते; एवढाच त्याचा अर्थ आहे. शिष्य शोधणारे गुरु खरे गुरूच नव्हेत.
या संदर्भात शास्त्रशुद्ध व अचूक मार्गदर्शन करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " श्रीगुरूंची, मोक्षगुरूंची योजना ईश्वरानेच केलेली असते. गुरु-शिष्य संबंध अनेक जन्मांचे असतात. नियोजित श्रीगुरूच योग्य वेळी शिष्याला भेटून कृतार्थ करतात. "
आपली व आपल्या श्रीगुरूंची भेट होणे ही ईश्वरेच्छाच असते व ते सर्व पूर्वनियोजित असते. त्या भेटीसाठीचे पुण्य आपल्या गाठीशी जमा झाले की बरोबर गुरुभेट होते. गुरु-शिष्यांचे जन्मजन्मांचे ऋणानुबंध असतात. ते बंध जाणूनच श्रीगुरु अनुग्रह करतात. सर्व संतांच्या चरित्रांमध्ये या ऋणानुबंधांच्या हकीकती वाचायला मिळतात. शिष्याची कर्मसाम्यदशा आली की बरोबर श्रीगुरूंची भेट होऊन कृपालाभ होतोच व त्यानंतरच खरा परमार्थ सुरू होत असतो.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates