6 November 2016

॥ अमृतबोध ॥ ६ नोव्हेंबर २०१६


नागाने नखाच्या टोकाला दंश केला तरी त्याचे विष क्षणार्धात संपूर्ण शरीरभर पसरते. " नखाग्री व्याळ लागे । तो शिखांत व्यापी वेगे ।" असे श्री माउली देखील म्हणतात. गंमत म्हणजे या नाग-विषाच्या प्रभावाने मिरची देखील गोड लागते.
या नागासारखेच श्रीसद्गुरूंचे कार्य असते. ते आपले ' शक्तियुक्त नाम ' रूपी अमृत, अनुग्रहाद्वारे साधकाच्या शरीरात कृपापूर्वक भिनवतात. फक्त फरक एवढाच आहे की, नाग घातक विष भिनवतो, तर श्रीसद्गुरु दंश करून म्हणजेच अनुग्रह करून अमर करणारे अलौकिक अमृत भिनवतात.
तो साधक जसजसा श्रीसद्गुरूंनी सांगितलेले साधन प्रेमाने व नेमाने करू लागतो, तसतसे ते अमृत त्याच्या सर्वांगात भिनते, त्याचे अंत:करणही व्यापून घेते. त्या कृपारूप अमृताच्या अद्भुत प्रभावाने तो साधकही मग त्यांच्याचसारखा, अंतर्बाह्य अमृतमयच होऊन ठाकतो !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates