8 November 2016

॥ अमृतबोध ॥ ८ नोव्हेंबर २०१६

देह हे माध्यम आहे खरेतर परमार्थाचे. पण लोक त्याचा परमार्थ सोडून सर्व गोष्टींसाठी सतत उपयोग करतात आणि शेवटी त्याच मायेत गुरफटून नाश पावतात. संतांना लोकांच्या या उफराट्या वागणुकीचे फार दु:ख होत असते. म्हणून अतीव कळकळीने ते उपदेश करून लोकांना सन्मार्गाला लावतात.
याच तळमळीने अत्यंत मोलाचा उपदेश करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " घोडे कितीही चांगले असले तरी ते पागेतच बांधतात; स्वयंपाकघरात आणून बांधत नाहीत. तद्वतच देहाचे कौतुक प्रपंचापुरतेच मर्यादित ठेवावे. परमार्थ साधून घेण्याइतपतच त्याचा उपयोग ठेवावा."
ज्याची जेवढी गरज तेवढेच त्याचे महत्त्व मानावे, हेच प. पू. श्री. मामा यातून आपल्याला समजावत आहेत. देहाला कवटाळून बसले तर त्याच्यासारखे आपणही नाशिवंतच ठरू. म्हणून परमार्थाचे साधन मानून या देहाचे आवश्यक तेवढेच कौतुक करावे, त्याला नीट सांभाळून राखावे व त्यातूनही आपला परमार्थच साधावा, हीच साधक म्हणून आपण सतत काळजी घ्यायला हवी !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates