7 November 2016

॥ अमृतबोध ॥ ७ नोव्हेंबर २०१६

एखादी गोष्ट सतत उगाळत बसणे, हा मनुष्यस्वभावच आहे. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही उगाळत बसतोच. कोणी सुख उगाळते तर कोणी दु:ख. कोणी स्वत:ची भलावण करते तर कोणी बायकोचे कौतुक उगाळते. कोणी सारखे काहीतरी रडगाणेच गात बसते. एकूण काय, निरर्थक काहीतरी उगाळल्याशिवाय माणूस जगूच शकत नाही.
आता या दुर्गुणाचा नेहमी तोटाच सहन करण्यापेक्षा त्याचा काही फायदा झाला तर तेवढाच लाभ होईल ना! याच भूमिकेतून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज उपदेश करतात की, " एखादी गोष्ट उगाळत बसणे हा मनुष्यस्वभावच आहे. पण घडून गेलेल्या अशा निरर्थक गोष्टी उगाळण्यापेक्षा, ' मी ब्रह्मस्वरूपच आहे ' हे उगाळणे बरे ! "
जुन्या, होऊन गेलेल्या गोष्टी आता  उगाळण्यात काय हशील? त्याचा फायदा काहीच नाही पण तोटेच फार. वेळेपरी वेळ वाया जातो, असलेली मनाची शांती तर ढळतेच शिवाय नसत्या चिंता वाढतात. त्यापेक्षा ' मी ब्रह्मस्वरूपच आहे ', ह्याचे सतत चिंतन केल्याने एखाद्या पावन दिवशी श्रीगुरुकृपेने खरोखर तो अनुभवच आपल्याला येईल !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates