24 November 2016

॥ अमृतबोध ॥ २४ नोव्हेंबर २०१६

साधकाची साधना ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. श्रीगुरूंची कृपा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असली, तरी अजूनही काही गोष्टी असतात. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " साधना ही पूर्वजन्मातल्या तयारीप्रमाणेच, कर्मांप्रमाणेच होत असते. म्हणूनच ती सोडूनही चालणार नाही. "
आपला पूर्वजन्मी जो काही साधनाभ्यास झालेला आहे, त्यानुसारच या जन्मी साधना घडते. पूर्वीच्या पुण्याने किंवा कर्माने साधना जेथवर आलेली असेल, तेथूनच पुढे या जन्मी श्रीगुरुकृपा होऊन साधना सुरू होत असते.
यासाठी पू. मामा फार सुंदर उदाहरण देतात. कापूर, शेणाची गोवरी व ओल्या शेणाचा गोळा या तीन पदार्थांचे ज्वलन कसे होते पाहा. कापूर काडी लागल्याबरोबर पेटतो. गोवरी थोडी धुमसून मग पेटते. तर शेणाचा गोळा आधी वाळावा लागतो, मग तो पेट घेतो. तसे, ज्याचे जेवढे साधन पूर्वी झालेले आहे, त्याला या जन्मी त्यानुसार लवकर किंवा उशीरा अनुभूती येते. पण पूर्वीचे गाठीशी आहे म्हणून या जन्मी साधनेचा कंटाळा करून चालत नाही. ती करावीच लागते. पू. मामा आवर्जून सांगत असत, " देहाची तीन चिमट्या राख होईपर्यंत साधना झालीच पाहिजे ! " त्यांनी स्वत: देखील हे सांगणे शेवटच्या क्षणपर्यंत पाळून आपल्यासमोर मोठा आदर्श घालून दिलेला आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates