19 November 2016

॥ अमृतबोध ॥ १९ नोव्हेंबर २०१६

' जो दुस-यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला । ' हे वचन सर्वश्रुतच आहे. या मागील मार्मिक सिद्धांत सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " एकाच कार्याबद्दल दोघांचे मत सारखे असणे कठीण; म्हणून दुस-यावर विसंबून कार्य हाती घेण्यात अर्थ नाही. "
एकाच गोष्टीबद्दल दोघेजण कधीच सारखे मत देऊ शकत नाहीत, म्हणून सर्वांचे एकमत होऊन कार्य तडीस जाणे फारच कठीण आहे. हे पक्के जाणून ज्याला यशस्वी व्हावयाचे आहे त्याने कधीच दुस-यावर अवलंबून कार्य हाती घेऊ नये, हा महत्त्वाचा बोध पू. मामा येथे करीत आहेत.
लहानपणी ऐकलेली दोन कबूतरे व पारध्याची गोष्ट त्यासाठी स्मरणात ठेवायला हवी. जाळ्यात उडालेली दोन कबूतरे फारच थोडा काळ एकत्र उडू शकली व त्यांचे कोणत्या दिशेने उडायचे? यावर दुमत झाल्याबरोबर ती जाळ्यासकट खाली पडली व अनायासे पारध्याच्या तावडीत सापडली. म्हणूनच प. पू. श्री. मामांचा हा बोध खूप महत्त्वाचा आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates