1 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *१ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ४७ ॥*

परमात्मा ईक्षण करून विश्व निर्माण करतो, असे श्रुतिमाता सांगते. याचे फार सुंदर स्पष्टीकरण प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज करतात.
एखादा मनुष्य झोपला असता, त्यास ना धड झोप ना धड जागृती अशी मधली स्वप्न अवस्था येते. त्या स्वप्नात दृश्य, द्रष्टा व दर्शन असे तिन्ही तोच बनलेला असतो. ते स्वप्न पाहणारा तोच, त्या स्वप्नात दिसणारे दृश्यही सगळे तोच बनलेला असतो व स्वप्न पाहण्याची क्रियाही तोच असतो. ही जशी त्याची मन:शक्ती कार्य करते, तशीच परमात्म्याची ईक्षण, संकल्पशक्ती कार्य करते. म्हणजेच परमात्मा विश्वरूप स्वप्न पाहतो म्हणा फारतर.
त्याची ही संकल्पशक्ती अव्यक्तातही आकाराचा आभास निर्माण करण्यास समर्थ असते. स्वप्नात जसे काहीही हाताशी नसताना सगळे विश्वच निर्माण केले जाते, तसे ही संकल्पशक्ती संपूर्ण चराचर विश्वाचा आभास निर्माण करते. हेच परमात्म्याचे ईक्षण होय.
तुम्ही आम्ही जीव त्या स्वप्न-विश्वाचेच घटक असल्याने, आपल्यासाठी ते विश्व सत्यच ठरते. माणूस स्वप्न बघत असताना, त्यावेळेपुरते त्याच्यासाठी ते सगळे खरेच असते. पण प्रत्यक्षात तो केवळ आभासच नाही का? तसेच हे विश्व परमात्म्यासाठी केवळ आभासच आहे. व्यक्त काय आणि अव्यक्त काय, दोन्हीचा त्या आनंदघन परमात्म्याला पत्ताच नसतो.
सूर्य उगवल्यावर जगाचे सर्व व्यवहार त्याच्या प्रकाशातच चालतात, पण म्हणून त्यांच्याशी सूर्याचा संबंध असतो का? त्या सूर्याच्या नकळतच सर्वांचे कार्य चालू असते. त्याप्रमाणे परमात्म्याच्या अधिष्ठानावर संकल्पशक्तीच विश्व निर्माण करते व पुन्हा त्याचा लयही करते, परमात्मा सर्वकाळी त्या सर्वांहून वेगळाच असतो.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates