12 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *१२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ५८ ॥*

सद्गुरु श्री माउली येथ भक्तीचे श्रेष्ठत्व सांगत आहेत. त्यांच्या त्या भक्तिविवरणाचे मर्म सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "खरे म्हणजे, प्रेमाने केलेले शास्त्रसंमत सर्वच कर्म श्रीभगवंतांना आवडते. भक्तीमध्ये श्रीभगवंतांचा परितोषच महत्त्वाचा असतो."
यासाठीच माउली प्रत्यक्ष श्रीभगवंतांच्याच मुखाने सांगतात की, "माझे माझ्या भक्तांवर इतके प्रेम असते की, मला अर्पण करण्याच्या बुद्धीने एखादे फळ किंवा फूल जरी त्यांनी दिले तरी मी ते तत्काळ सेवन करतो. फळ-फूल सोडा, साधे वाळलेले पान जरी अर्पण केले तरी, ते शुद्ध भक्तिप्रेमाने मला दिलेले असल्याने, मला अमृतपानासारखेच वाटते. त्यानेही मी तृप्त होतो. एकवेळ पालाही नाही मिळणार, पण जगात पाण्याला काहीच कमतरता नाही ना? तेही जर मनोभावे मला अर्पण केले तर त्यानेही मी अत्यंत संतुष्ट होतो. अर्जुना, सुदाम्याचे पोहे नाही का मी आवडीने भक्षण केले? कारण, मला खरा भक्तिभाव प्रिय आहे, त्यात लहान-मोठा असा भाव मी मानत नाही. ज्याच्या मनात माझ्याविषयी निष्कलंक, अव्यभिचारी भक्ती आहे, त्याच्या घरचा मी कायमचाच पाहुणा आहे. म्हणून ज्याला माझे प्रेम संपादन करावयाचे आहे, त्याने आपली मन व बुद्धी स्वाधीन ठेवून, आपल्या हृदयात माझे विस्मरण कधीही होऊ देऊ नये !"
श्रीभगवंतांना ज्याने संतोष होईल, ते ते प्रत्येक शास्त्रोचित कर्म हे भक्त म्हणून आपले आवश्यक कर्तव्यच नव्हे काय?
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates