27 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७३ ॥*

सद्गुरु श्री माउली म्हणतात, *"तैसा स्वरूपाचिया प्रसरा - । लागीं प्राणेंद्रियशरीरां । आटणी करणें जें वीरा । तेंचि तप ॥ज्ञाने.१६.१.१०८॥"* या ओवीचे बहारीचे विवरण प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज करतात.
आटवण्याची प्रक्रिया आपल्या ओळखीची आहे. पाणी मिसळलेले दूध अग्नीवर ठेवले व लक्ष देऊन सतत ढवळत राहिले की त्यातले पाणी हळूहळू निघून जात जात त्याचा खवा होतो. तेच दूध जर सुरुवातीला जमिनीवर टाकले असते, तर ओघळून वाया गेले असते. आता तेच दूध खव्याच्या स्वरूपात जमिनीवर ठेवले असता हलतही नाही.
तसे, मूळचा ब्रह्मस्वरूप जीव, वासनांच्या संगतीने भ्रमात पडून, स्वत:च्या स्वस्वरूपास विसरून 'मी देहच' असे म्हणू लागतो. त्याची सर्व इंद्रिये त्या वासनांनुसारच कार्य करीत असतात.
पूर्वपुण्याईच्या योगाने श्रीगुरूंची त्या भाग्यवान जीवावर कृपा होते व ते त्याला आपल्या शक्ती, युक्ती व ज्ञानासहित साधना देतात. त्या साधनारूपी अग्नीच्या तापाने त्याच्याठायी मिसळलेले हे वासनांचे पाणी हळूहळू आटते व तो शुद्ध होतो. सद्गुरूंनी दिलेली साधना, जशी सांगितलेली आहे अगदी तशीच नेमाने व प्रेमाने करणे, हीच साधकाची तपश्चर्या असते. कारण कोणीतरी दिल्याशिवाय व त्यावर तप केल्याशिवाय कधीच प्राप्ती होत नसते ! त्या तपश्चर्येमुळेच त्याच्यापुढे दैवत प्रकट होते.
पण यासाठी माउली स्पष्ट सांगतात की, *'दिधल्यावीण प्राप्त ।'* कोणीतरी म्हणजेच परंपरेने आलेल्या अधिकारी सद्गुरूंनी हे साधन कृपापूर्वक द्यावे लागते, तरच त्या जीवाकडून तपश्चर्या घडते. आपल्या मनानेच काही करून चालत नाही.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates