25 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२५ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७१ ॥*

सद्गुरु श्री माउली पाचव्या अभंगात, श्रीगुरुकृपेनेच अनुभव लाभतो असे म्हणतात. त्यातील 'अनुभव' या शब्दाचे प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज फार मार्मिक विवेचन करताना म्हणतात, अनुभवाचे पुष्कळ प्रकार आहेत. साधे समाधानाचे उदाहरण घ्या. भुकेल्यापुढे पंचपक्वान्ने ठेवली. जेऊन तो तृप्त झाला, त्याला समाधान झाले. दुस-या दिवशी, कालच्याप्रमाणेच तो जेवण मिळेल म्हणून आला. त्या दिवशी त्याला काहीच मिळाले नाही. तेव्हा कालचे ते समाधान टिकेल का त्याचे? म्हणूनच शास्त्र सांगते की, भोजनाने, श्मशानाने व मैथुनाने जे वैराग्य निर्माण होते, ते खरे नाही. भोजनाने तात्पुरता समाधानाचा अनुभव येतो. पण आत्यंतिक समाधान कसे होईल? याचे उत्तर देताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, ज्याच्या जठरास कायम अमृताचा निर्झर सापडेल, त्याचेच समाधान अखंड टिकून राहील.
त्याचप्रमाणे, आपण करतो त्या भजन-पूजनातही समाधान तेवढ्यापुरतेच लाभते, पूर्ण नाही. परंतु श्रीगुरु जेव्हा मार्गदर्शन करतात, ते आपल्या शक्तीने, युक्तीने व ज्ञानाने, म्हणजेच अनुभूतिज्ञानाने शिष्यास कृपा करतात; तेव्हाच शाश्वत समाधान लाभते.
पण त्यापुढेही त्या शिष्याचे काही कर्तव्य असतेच. तेच माउली पुढील चरणात सांगतात, ते आपण उद्या पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates