2 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ४८ ॥*

भगवान श्री माउलींच्या हरिपाठातील तिस-या अभंगातील *'जेथूनि चराचर हरिसी भजे ॥'* यामधल्या 'जेथूनि' शब्दाला खूप महत्त्व आहे, असे प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. जेथूनि म्हणजेच जिच्या साहाय्याने किंवा जिच्या माध्यमातून. श्रीभगवंतांपासून त्यांची शक्ती उत्पन्न होते. त्या भगवती शक्तीला शरण गेल्यानंतरच, चराचरात परमात्मा भरून राहिलेला आहे, याची अनुभूती येते.
पू.मामा येथे ब्रह्मसूत्रांचा संदर्भ देतात. ज्याच्या रचनेची नुसती कल्पनाही आपल्या मनाला करता येत नाही, त्या जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारी शक्ती ज्या कारणापासून निर्माण होते, तेच 'ब्रह्म' होय. या ब्रह्माची शक्तीच केवळ हे अवघड कार्य सहज संपन्न करते. अन्य कोणीच हे करू शकत नाही.
म्हणून पू.मामा सांगतात की, "परमात्म्यापासून निर्माण झालेल्या भगवती शक्तीच्या शरणागतीनेच चराचरात परमात्मा आहे, हा अनुभव मिळतो. तिला शरण गेल्याशिवाय निर्गुण-सगुण अनुभूती येत नाही. तिच्या कृपेशिवाय शरणागतीपूर्वक खरे भजनही घडत नाही."
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates