3 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ४९ ॥*

सद्गुरु श्री माउली सांगतात की, परमात्म्याशी अभिन्न असणा-या भगवती शक्तीला शरण गेल्याशिवाय सगुण-निर्गुणाची यथार्थ अनुभूती येत नाही.
शरणागती शब्द सगळ्यांना माहीत आहे. पण शरण जायचे म्हणजे नक्की काय करायचे? हे कुठे कोणाला नेमके माहीत आहे? यासाठीच प.पू.मामासाहेब देशपांडे महाराज सद्गुरु श्री माउलींची एक अप्रतिम ओवी सांगतात की, *सुवर्णमणि सोनया । ये कल्लोळ जैसा पाणिया । तैसा मज धनंजया । शरण ये तूं ॥ज्ञाने.१८.६६.१४००॥* "सोन्याचा बनवलेला मणी जसा उष्णतेने आपला आकार टाकून पुन्हा सोने बनतो; संथ पाण्यावर उठलेली लाट स्थिरावली की पुन्हा संथ पाणीच होते; किंवा लाट असतानाही ती पाणीच असते; त्याप्रमाणेच हे धनंजया, तू मला शरण ये"; असे श्रीभगवंत सांगतात.
म्हणजे ज्याला शरण जायचे अाहे, त्याच्याशी मुळात असलेली एकरूपता आपल्याला समजल्याशिवाय माउलींना अभिप्रेत असणारी शरणागती होऊच शकत नाही. आणि श्रीभगवंतांच्या शक्तीला, असे तिच्याशी एकरूप होऊन शरण जाता आले, तरच ख-या परमार्थाची अनुभूती येत असते. अर्थात् हे शरण जाणे देखील त्या शक्तीच्याच कृपेने शक्य होत असते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates