24 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७० ॥*

भावाशिवाय देवाचा नि:संदेह अनुभव येत नाही, असे प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. याच्या स्पष्टीकरणासाठी ते एक सुंदर उदाहरणही देतात. एकाला मूल होत नव्हते. त्याला एकाने अमुक मंदिरात जाऊन नवस करायला सांगितला. त्या नवसाप्रमाणे त्याला मुलगा झाला. तेव्हा त्याला देवांचे माहात्म्य कळले, देवांचा अनुभव आला.
परंतु पुढे तो मुलगा चो-या करू लागला व याची पत गेली. त्यामुळे ज्या देवांनी मुलगा दिला, त्यांनाच हा शिव्या घालू लागला. आता सांगा, देवाचा अनुभव आला, देव कळला, पण तो नि:संदेह कळला का? म्हणूनच देव नि:संदेह कळण्यासाठी अंत:करणाची पूर्ण शुद्धी व्हावी लागते; आणि त्यासाठीच श्रीगुरूंची नितांत आवश्यकता असते.
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगात स्पष्ट म्हणतात, *"भावेंवीण देव नकळे नि:संदेह । गुरुविणें अनुभव कैसा कळे ॥हरि.५.२॥"* श्रीगुरूंच्या कृपेशिवाय परमार्थाचा खरा अनुभव कधीही येत नाही, हे त्रिवार सत्य आहे !
( *छायाचित्र संदर्भ : साक्षात् भगवान श्रीशंकरांनी स्वहस्ते प्रसाद म्हणून दिलेल्या दिव्य शिवलिंगाशेजारी बसलेले पू.मामा. _' श्रीरामेश्वरनाथ '_ असे नामकरण केलेले हे प्रासादिक आत्मलिंग, सध्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथे नित्यपूजनात आहे. महाशिवरात्री निमित्त अमृतमय दर्शन.*)
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates