8 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ५४ ॥*

भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या चौथ्या अभंगाच्या शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. त्याचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, सर्वसामान्य लोक जेवढ्या आस्थेने प्रपंच करतात, तेवढ्या परिश्रमाने हरिभजन करीत नाहीत; असे येथे माउली आपले दु:ख व्यक्त करतात. आणि म्हणतात की, जर त्याच आस्थेने, प्रेमाने भगवन्नामाचा सतत जप केला, तर या दु:खमूळ प्रपंचाची आसक्ती हळू हळू कमी होत जाऊन, त्याच्या जीवघेण्या बंधनातून तुमची मुक्तता होईल व सर्वश्रेष्ठ असा आनंदही प्राप्त होईल.
प्रपंचाची आपल्याला रात्रंदिवस सवय पडलेली असते. त्यामुळे आपण त्यात सतत गढून गेलेलो असतो. तो प्रपंच कायम वेगवेगळी दु:खेच समोर आणत असला, तरीही आपण नेटाने करतोच ना? पण तीच आपली आस्था परमार्थ करायचा म्हटला की कोठे निघून जाते बरे? जर तेवढ्या प्रेमाने आपण नाम घेतले तर दु:खांचा व दु:खरूप प्रपंचाचाही समूळ नाश होईलच, असे श्री माउली छातीठोकपणे सांगतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates