20 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२० फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६६ ॥*


सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगात संतांच्या संगतीचे महत्त्व मार्मिक शब्दांमध्ये सांगतात. त्याचा सोपा शब्दार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "बहुतकाल पर्यंत परिश्रम केल्यावाचून देवताप्रसाद कसा होणार? काहीतरी दिल्यावाचून मोबदला कसा मिळणार? तितकी सलगी घडल्यावाचून मनातील गुह्य गोष्ट कोण उकलून दाखविणार? आणि आपले हित कसे होणार? म्हणूनच श्री माउली स्वानुभवाची सत्य गोष्ट सांंगतात की, गड्यांनो, साधुसत्पुरुषांची संगत धरा; म्हणजे ते तुम्हांला संसारातून पार तरून जाण्याचा मार्ग सांगतील."
खूप तपश्चर्या केल्याशिवाय कोणतीही देवता कधी प्रसन्न होत नसते. आपण काहीतरी दिल्याशिवाय त्याचा मोबदला कसा मिळणार आपल्याला परत? आणि एखाद्याशी आपली तेवढी जवळीक झाल्याशिवाय तो त्याचे गुह्य आपल्याला सांगत नसतो. तसेच, साधुसंतांशी आपली नम्रतेने जवळीक झाल्यावरच आपल्या हिताची गोष्ट ते आपल्याला सांगतात. म्हणून संतसंगती मिळवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates