19 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *१९ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६५ ॥*

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठाच्या पाचव्या अभंगाचा सरलार्थ सांगताना म्हणतात की,  आत्मज्ञान हा परमार्थाचा सर्वोच्च अनुभव आहे. हे आत्मज्ञान केवळ अष्टांग योगसाधना किंवा यज्ञयागादिकांच्या आचरणाने प्राप्त होत नसते. कारण यांमुळे केवळ व्यर्थ दगदग होते व त्यातून दांभिकपणाच वाढत असतो. जोवर खरी तळमळ लागत नाही तोवर ही साधनेही मनापासून व अचूक घडत नाहीत. शुद्ध भाव असल्यावाचून श्रीभगवंतांचे नि:संशय ज्ञान होणार नाही आणि सद्गुरुकृपेवाचून स्वस्वरूपानुभव घडणार नाही.
भाव शुद्ध असला तरच परमार्थाचा खरा अनुभव येतो व त्याद्वारेच श्रीभगवंतांचे नि:संशय आणि समग्र ज्ञान होत असते. असा भाव आतून जागृत झाला, की मगच श्रीसद्गुरुकृपा होऊन आपल्या हातून प्रेमाने व नेमाने साधना घडते आणि स्वस्वरूपाची यथार्थ अनुभूती लाभून साधक धन्य होतो.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates