23 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *२३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६९ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगात शुद्ध भावाचे माहात्म्य सांगतात. या संदर्भात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी एक सुंदर गोष्ट सांगत असत.
एका बाईने नऊ महिने पोटी भार वाहिल्यामुळे, आपल्या मुलाचे हित व त्याबद्दल भाव तिच्या मनात निर्माण होणे साहजिकच होते. दुसरी एक बाई होती, तिला मूल नव्हते; पण मूल असावे असे वाटत असल्याने तिने हिचे मूल चोरून नेले.
शोध केल्यावर ती बाई सापडली पण दोघी मुलावर हक्क सांगू लागल्या. प्रकरण न्यायालयात गेले. दोघींचे म्हणणे ऐकल्यावर न्यायाधीशांनी युक्ती केली. त्यांनी पट्टेवाल्याला तलवार आणून मुलाचे दोन तुकडे करून दोघींना द्यायला सांगितले.
हे ऐकल्याबरोबर ज्या बाईने नऊ महिने पोटी भार वाहिला होता, तिला दु:ख सहन न होऊन ती म्हणाली, "महाराज, हा मुलगा कोठेही असो, परंतु सुखी असो. तुम्ही कृपा करून त्याचे तुकडे करू नका." हे ऐकताच त्या दुस-या भाव नसलेल्या बाईला, आता आपल्याला मूल मिळणार याचा आनंद झाला. पण न्यायाधीशांनी खरी आई ओळखून ते मूल भाव असलेल्या बाईला देऊन टाकले.
खरा विशुद्ध भाव असा बाहेरून आणता येत नाही, तो आतूनच यावा लागतो; व तो आल्याशिवाय देवांची नि:संदेह प्राप्ती होत नसते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates