7 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ५३ ॥*

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली हरिपाठाच्या चौथ्या अभंगातून आपल्याला फार मार्मिक उपदेश करतात. त्यावर नेमके भाष्य करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, अंतर्यामी भक्ती ठसल्याशिवाय मुक्तीचे नावच काढू नये. जसे, अंगी काहीतरी करामत, कौशल्य, बळ असल्याशिवाय पराक्रमाच्या पोकळ गप्पांना अर्थ तरी असतो का? तसे, नुसती लगबग करून परमार्थ होत नाही किंवा ईश्वरप्रसाद लाभत नाही. त्यासाठी स्वस्थपणाने राहून, निश्चल स्थिती प्राप्त करून घ्यावी लागते. त्याशिवाय बाकीच्या सर्व खटपटी व्यर्थ आहेत.
परमार्थ हा बोलघेवड्यांचा प्रांतच नव्हे. जो नेटाने व कष्टाने तसेच प्रेमादराने श्रीगुरूंनी दिलेले साधन करतो, तोच या प्रांतात खरोखरीच काहीतरी मिळवतो. बाकी नुसत्या गप्पा मारणा-यांना येथे काहीही प्राप्त होत नाही. योग्य दिशेने, योग्य प्रकाराने, निष्ठेने व शांतपणे केलेले प्रयत्नच परमार्थात यशस्वी होतात. इथे केवळ धावाधावीला किंमत नाही. उलट सर्व प्रकारचे निश्चलत्व कसे साधेल? हेच येथे महत्त्वाचे मानलेले आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates