10 February 2017

॥ अमृतबोध ॥ १० फेब्रुवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ५६ ॥

आपल्या अंत:करणातील प्रेमभावाला सद्गुरूंच्या कृपेचे बळ प्राप्त झाले की अनुभूतीरूप फळ मिळते; असे पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. याचे आणखी स्पष्टीकरण करताना ते म्हणतात की, एखाद्याला शिरा-पुरी खायचा भाव निर्माण झाला; परंतु ते बनवण्याची माहिती व सामानसुमान जमवून ते करण्याचे कष्ट केल्यानंतरच तृप्ती लाभते. तसेच आपल्या प्रेमभावाचेही असते. त्याला श्रीसद्गुरूंच्या कृपेचे बळ लाभल्यावरच तृप्ती मिळते.
यासाठी पू.मामा श्रीसंत एकनाथ महाराजांचे सुंदर प्रमाण सांगतात. प्रेमाशिवाय सर्व काही व्यर्थ अाहे. वेदांचे ज्ञान, श्रुती, स्मृती, ध्यान-पूजन, श्रवण कीर्तन इत्यादींचे ज्ञान श्रीगुरूंकडून करून घेतले; तरी ते नुसते शब्दज्ञान होईल. परंतु तेच शक्तियुक्त म्हणजेच प्रेमयुक्त मिळाले तर मात्र उपयोगी पडेल. श्रीसद्गुरूंची ही प्रेममय कृपाशक्ती पूर्वपुण्याईने प्राप्त होते. ती मिळाल्यानंतर साधनाही प्रेमाने घडली पाहिजे. अशी भक्ती झाली की मुक्ती मिळणारच, असे श्री माउली आवर्जून सांगतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates