18 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *१८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६४ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या चौथ्या अभंगात शेवटी हरिनामाचे माहात्म्य सांगताना म्हणतात, *"ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचे ॥"* वैखरीने हरिनाम घेतल्यावर पाप नाहीसे होते. पातक नाहीसे करण्याचे सोपे शास्त्र म्हणजे हरिनाम घेणे. पण शास्त्रांचे तेवढ्याने समाधान होत नाही. शास्त्र म्हणते की नाम मध्यमेत व्हायला हवे. म्हणजे मग त्याचा 'जप' होतो. 'मी देह आहे' हा भाव मायेमुळे होऊन बसलेला असतो, तो नाहीसा होणे म्हणजे प्रपंचाचे धरणे तुटणे.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज यासाठी फार सुंदर उदाहरण देतात. नारळात जोपर्यंत ओलसरपणा असतो तोपर्यंत खोबरे अलग होऊ शकत नाही. मात्र तो ओलेपण सुकल्यावर वरची करवंटी फुटली तरी आतल्या खोब-याला काहीच होत नाही. तसेच, जप होता होता मायेच्या अज्ञानाचा ओलावा नष्ट होऊन साधकाचा मी अलग होत जातो. मी जीवात्मा नसून श्रीभगवंतांचा अंश आहे, हे ज्ञान होते व श्रीगुरुकृपेने प्रपंचाचे धरणे तुटते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates