22 December 2016

॥ अमृतबोध ॥ २२ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ६ ॥

सद्गुरु भगवान श्री माउलींच्या हरिपाठाच्या पहिल्याच अभंगातील प्रथम चरणावर प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी अनेक बाजूंनी सखोल विचार मांडलेला आहे.
'देवाचिये द्वारी'चे विशेष संदर्भ सांगताना ते म्हणतात, " आता प्रश्न असा आहे की, देवांच्या द्वारात उभे राहण्याची प्रथा आहे की बसण्याची? आम्ही लहानपणी देवळात जात असू, तेव्हा मोठी माणसे आम्हांला मंदिरात थोडे बसायला सांगत व तीही बसत असत. हीच प्रथा आपण सगळे पाळीत आलो आहोत. म्हणजे माउली 'उभा क्षणभरी' म्हणतात, त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच असला पाहिजे.
अध्यात्मशास्त्राची सुरुवातच शरीरमीमांसेने होत असते. म्हणून इथे श्री माउलींना आपला 'देह' हेच 'मंदिर' व त्यातील 'आत्मा' हाच 'देव' म्हणून अभिप्रेत आहे. " यापुढे जाऊन पू.मामा सांगतात की, " देवाच्या द्वारात उभे राहिले असता, सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता या चार मुक्ती साधतात. "
आपला देह हेच मंदिर म्हटल्यावर त्याची द्वारे कोणती व तेथे कोण उभा राहतो, हे बघितले म्हणजे झाले. याचा उलगडा पुढे क्रमाने होईलच. चारी मुक्तींसंबंधी पू.मामांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी फारच सुंदर उदाहरण देत असत. ते नीट समजून घेतले की, माउली  यातून काय सांगतात, हे अधिक स्पष्ट होईल. ते उदाहरण आपण उद्या सविस्तर पाहूया.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates