19 December 2016

॥ अमृतबोध ॥ १९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ३ ॥

एकाच सलग दो-यामध्ये विविध रंगांची, विविध सुवासाची फुले ओवून हार बनवला जातो. फुले भिन्न भिन्न असली तरी त्यांना एकत्र सांधणारा दोरा मात्र एकच असतो. हेच हरिपाठाच्याही बाबतीत आहे. याबद्दल सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " फुले अनेक असली, तरी हाराचा दोरा एकच असतो. तसेच हरिपाठाच्या अभंगरूपी फुलांना एकत्र आणणारे सूत्र 'हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।' हेच आहे. "
भगवान श्री माउलींनी अठ्ठावीस अभंगांचा हरिपाठ रचलेला आहे. या अठ्ठावीस अभंगरूपी फुलांना एकत्र बांधणारे सूत्र ते पहिल्या अभंगाच्या ध्रुवपदात सांगतात. संपूर्ण हरिपाठाचेही पालुपद असणारे हे सूत्र, 'हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।' हे होय. हरि हरि म्हणण्याने एवढे पुण्य होईल री, त्याची गणनाच कोणीही करू शकणार नाही.
येथे पू.मामा एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की, एवढी जरी पुण्याई झाली, तरी पुनर्जन्माचा धोका टळत नाही. शिवाय या पुण्याचा हरिचरणीं पूर्ण विनियोग करता नाही आला, तरी पंचाईत. यासाठी माझी आई नहुष राजाची गोष्ट सांगत असे. नहुष राजाने शंभर अश्वमेध केले. त्यामुळे पुण्याचे पर्वतच्या पर्वत तयार झाले, त्याला इंद्रपदही मिळाले. पण त्या पुण्याचा 'विनियोग' कसा करावा? हे न कळल्यामुळे त्याच्याकडून ऋषींचा अपमान झाला व त्याला सर्प बनून पृथ्वीवर पडावे लागले. म्हणून नुसते नाम घेऊन चालत नाही, तर त्या नामाचे शास्त्रही श्रीगुरुमुखातून समजून घेऊन, त्याबरहुकूम साधना करावी लागते. तेव्हाच त्या कृपायुक्त हरिनामाने अपार पुण्य लाभून देवाच्या द्वारात उभे राहण्याचे भाग्य मिळते !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates