9 December 2016

॥ अमृतबोध ॥ ९ डिसेंबर २०१६

मनुष्यप्राण्याला एक विचित्र खोड असते. तो सतत बाहेर आनंद शोधत राहतो. आनंद खरेतर आपल्या आतच असतो, आपण त्याचा आरोप बाहेरच्या गोष्टींवर करतो. साधे जेवणाचे उदाहरण पाहा. पोटभर जेवल्याने आनंद झाला म्हणतो आपण. पण तो बाहेरून कुठून येत नाही, तो तर आतच असतो. जर अन्नातच आनंद असता, तर मग विटलेले अन्नही आपण गोड मानून खाऊ शकलो असतो की नाही? म्हणजे आनंद आमच्या आतच आहे, तो विविध निमित्तांनी आम्हीच बाहेरच्या गोष्टींवर आरोपित करतो.
या बाहेरच्या विषयांची गोडी आपल्याला इतकी जडलेली असते की, त्यातला खरा आनंद हा त्या परमात्म्याचाच असून तो पूर्णपणे आपल्या आतच आहे, हेच कळता कळत नाही. म्हणून मग त्या मूळच्या अतिशय गोड परमार्थाची खरी गोडी आपल्याला लागतच नाही. परमार्थाची प्राप्ती न होण्याचे हेच कारण प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, " बाहेरच्या विषयांची गोडी सोडणे मनुष्यप्राण्याला कठीण जाते. त्यामुळेच मूळच्या गोड परमार्थाची त्याला प्राप्ती होत नाही ! "
विषयातला आनंद हा शुगरकोटेड पिल सारखा असतो. वरून गोड लागला तरी आतून तो कडूच असतो. पण परमार्थाचे तसे नाही. त्यातला आनंद निखळ व शाश्वतच असतो.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates