8 December 2016

॥ अमृतबोध ॥ ८ डिसेंबर २०१६


श्रीसद्गुरूंच्या कृपेला श्री ज्ञानेश्वर महाराज कृपादीपकच म्हणतात. खरोखरीच, त्याच दीपाच्या प्रकाशात सुयोग्य मार्ग लाभून जीवाचे कल्याण होत असते.
यासंदर्भात फार मार्मिकपणे बोध करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " श्रीसद्गुरूंच्या कृृपेनेच खरा मार्ग लाभतो. तोपर्यंत चाचपडणा-या अंधळ्यासारखीच जीवाची अवस्था असते !"
प्रत्येक जीव आपल्या पूर्वकर्मांनी होणा-या बुद्धीनुसार वागत असतो. ती बुद्धी एकप्रकारे अंधच होय. कारण योग्य काय व अयोग्य काय? हे त्या बुद्धीला नीट कळत नाही. मग त्या बुद्धीनुसार वागणे हे अंधळ्याने चाचपडत काम करण्यासारखेच नाही का? पण जेव्हा एखाद्या जीवावर सद्गुरूंची कृपा होते, तेव्हा त्याच्या बुद्धीत प्रथम विवेक निर्माण होतो व त्याचवेळी ख-या अर्थाने त्या जीवाला योग्य-अयोग्याचे भान येत असते व अचूक मार्गाने त्याची वाटचाल सुरू होते. यासाठीच, श्रीगुरुकृपा न लाभलेल्या जीवाच्या प्रयत्नांना प.पू.मामा येथे अंधाच्या चाचपडण्याची उपमा देत आहेत.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates