28 December 2016

॥ अमृतबोध ॥ २८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १२ ॥

नऊ द्वारांच्या शरीररूपी द्वारिकेतील इंद्रियदेवता म्हणजेच त्या द्वारिकेचे राणे होत. हे राणे 'पांडवां घरी' येतात म्हणजे काय? प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज याचा सुरेख खुलासा करतात. ते म्हणतात की, 'द्वारिकेचे राणे'चा खुलासा झाल्यावर मी आमच्या आईला, "मग पांडव म्हणजे काय?" विचारले. ती म्हणाली, " पांडव म्हणजे पंचप्राण. एक उदाहरण सांगते. पतंगाला मांज्याचे एक टोक बांधलेले असते, दुसरे टोक रिळाला बांधलेले असते व ते  पतंग उडवणा-याच्या हातात असते. त्याच्या मनाला वाटेल तसा तो पतंग उडतो. तसे, इंद्रियांच्या देवतांना प्राणरूपी दो-याने आवरले जाते. पतंग म्हणजे देवता, प्राण म्हणजे मांजा. या देवतांना 'पांडवां घरी' म्हणजे हृदयात आणले जाते. यालाच 'प्रत्याहार' म्हणतात. या देवता हृदयातील ईश्वराजवळ येऊन शांत होतात व त्याचवेळी विषय देखील संपतात."
ऐतरेय उपनिषदात सांगितलेले आहे की, सर्व देवता मानवी शरीरात आपापल्या जागी बसल्यावर, 'आपण कोठे बसायचे?' असा विचार करून परमात्मा दशमद्वारात विराजमान झाले. या दशमद्वारात जाण्याचा जीवाचा आटापिटा असतो.
प्राणरूपी मांजा ज्या ठिकाणी स्थिर होतो, ते ठिकाण म्हणजे भ्रूमध्य, आज्ञाचक्र होय. त्याठिकाणी विषयांचे मालक असणा-या मनाला प्राण आणून ठेवतो. भ्रूमध्य हेच 'देवाचे द्वार' होय. या ठिकाणी मन स्थिर झाल्यावर आपोआपच चारी मुक्ती साधल्या जातात.
इंद्रियांच्या देवतांचे प्राणांच्या घरी जाणे कसे होते? याविषयी पू.मामा आणखी महत्त्वाचा खुलासा करतात, तो आपण उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates