3 December 2016

॥ अमृतबोध ॥ ३ डिसेंबर २०१६


प्रपंचात उतावळेपणा चालत नाही. परमार्थात किंवा साधनेतही तो अजिबात चालत नाही. दोन्हीकडे लाभ होतो, पण त्यासाठी काहीतरी वेळ हा लागतोच.
या संदर्भात प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " प्रपंच जसा उतावळेपणाने चालत नाही, तसेच साधनेचेही असते. साधनेतही अनुभव येतात, पण वाट पाहावीच लागते. "
हे समजावून सांगताना प. पू. मामा एक घरगुती उदाहरण देतात. ते म्हणतात, साधा कुकर लावायचा झाला तरी भात व्हायला काही मिनिटे थांबावे लागते. शिवाय तो झाल्या झाल्या लगेच काढताही येत नाही. तसेच साधनेमध्येही वाट पाहावी लागते, थांबावे लागते. नियमाने व प्रेमाने साधना झाली की अनुभव येणारच. घाई करून काही होत नसते. आवश्यक तेवढा वेळ द्यावाच लागतो. आज श्रीगुरुकृपा झाली म्हणजे उद्या देवदर्शन होत नसते. म्हणून आपण उतावळेपणा न करता, सतत वाढत्या उत्साहाने व आवडीने साधना करीत राहिले पाहिजे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates